Tuesday, December 14, 2010

सागर हा असा कोपला का?

२६ डिसेंबर २००४  मध्ये जेव्हा त्सुनामी आल्या होत्या तेव्हा त्याने पहिली कविता केली होती..
त्याच्या पहिल्या कवितेनेच या blog  ची सुरुवात करणार आहे..

सागर हा असा कोपला का?


जीव जनावर देत आला ठाय
सागर हा असा कोपला का?

स्वप्ना पहाटेचे खरेचं होणारे
घरातले सारे गोड स्वप्नी..!
पाहता पाहता दृष्टी गेली पार
सकाळी अंधार अनंताचा..!

भूकंप होऊन पाणी उसळले
परास्त होऊन आणि कोसळले..!
कोसळलेले पाणी घरांवर खेळले
अश्रू ओघळले अखेरचे..!

कोणती अशी हि सागराची माया
कालीकुत्ता  छाया  मरणाची..!
सागराला होता किनारा धरून
 त्याचेही भरून आले मन..!

ज्याने दिले जीवन त्याने दिले मरण
नसताना कोणी कोणतेही कारण..!
लोकांचे या कसे भाग्य असे खोटे
सकाळी सूर्यास्त पाहण्याचे..!

वर्ष अखेर जीवन  नष्ट झाले
वर्षा बरोबर लोकही गेले..!
गेले  त्यांना आता कोणी कसे गावे
पुन्हा  उगवावें जोमदार..!

No comments:

Post a Comment